दान करा

आध्यात्मिक संस्कृतीचा पाया सेवाभाव – पंतप्रधान नरेंद्र मोदी

आध्यात्मिक संस्कृतीचा पाया सेवाभाव - पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताची आध्यात्मिक संस्कृती समाजाला जोडण्याचे, करुणा वाढविण्याचे, आणि सेवेकडे नेण्याचे कार्य करते. याच सेवाभावाला अधिष्ठान मानून शासन कार्यरत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायगड येथे केले. इस्कॉन प्रकल्पातील श्री राधा मदनमोहनजी मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

भारताची आध्यात्मिक संस्कृती समाजाला जोडण्याचे, करुणा वाढविण्याचे, आणि सेवेकडे नेण्याचे कार्य करते. याच सेवाभावाला अधिष्ठान मानून शासन कार्यरत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायगड येथे केले. इस्कॉन प्रकल्पातील श्री राधा मदनमोहनजी मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

भारत देश केवळ भौगोलिक सीमांचे प्रतीक नसून जिवंत संस्कृतीचे द्योतक आहे. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी भगवान श्रीकृष्णाच्या श्लोकांचा दाखला देत, खरी सेवा ही नि:स्वार्थी असल्याचे नमूद केले. सेवाभावाच्या या तत्त्वावर भारताची संस्कृती उभी आहे. इस्कॉनच्या माध्यमातून गीतेचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचले आहे. इस्कॉनचे वैदिक शिक्षण केंद्र, संग्रहालय, व उपासना स्थळे समाजाला जोडण्याचे कार्य करीत आहेत.

सेवाभावातून भारताचा अध्यात्मिक वारसा

भारत देश केवळ भौगोलिक सीमांचे प्रतीक नसून जिवंत संस्कृतीचे द्योतक आहे. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी भगवान श्रीकृष्णाच्या श्लोकांचा दाखला देत, खरी सेवा ही नि:स्वार्थी असल्याचे नमूद केले. सेवाभावाच्या या तत्त्वावर भारताची संस्कृती उभी आहे. इस्कॉनच्या माध्यमातून गीतेचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचले आहे. इस्कॉनचे वैदिक शिक्षण केंद्र, संग्रहालय, व उपासना स्थळे समाजाला जोडण्याचे कार्य करीत आहेत.

सांस्कृतिक वारसाचा विकास

पंतप्रधान मोदींनी सांगितले की, गेल्या दशकात भारताने विकास व सांस्कृतिक वारसा यामध्ये प्रगती साधली आहे. इस्कॉन सारख्या संस्था या वारसाच्या संवर्धनात मोलाची भूमिका बजावत आहेत. यामध्ये मंदिरांचे महत्त्व अधोरेखित होत असून, हे केंद्र समाजाला शिक्षण व कौशल्ये पुरवितात. रामायण व महाभारत यावर आधारित संग्रहालय आणि वृंदावनाच्या प्रेरणेने तयार होणारी बाग ही नवीन पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल.

सरकारचे सेवाभाव प्रेरित उपक्रम

पंतप्रधानांनी सरकारच्या विविध कल्याणकारी योजना जसे की प्रत्येक घरात शौचालय, गॅस कनेक्शन, नळाला पाणी, आणि मोफत वैद्यकीय सेवा यांचा उल्लेख केला. या योजना सेवाभावाच्या तत्वावर आधारित असल्याचे त्यांनी नमूद केले. कृष्णा सर्किटद्वारे धार्मिक स्थळांचे जाळे जोडण्याचे प्रयत्नही त्यांनी अधोरेखित केले. यामुळे देशातील श्रद्धास्थळांना जागतिक स्तरावर मान्यता मिळेल.

इस्कॉनच्या योगदानाचे कौतुक

पंतप्रधानांनी इस्कॉनच्या शैक्षणिक, आरोग्य, व पर्यावरणविषयक उपक्रमांचे कौतुक केले. कुंभमेळ्यादरम्यान इस्कॉनच्या महत्त्वपूर्ण सेवेचा त्यांनी उल्लेख केला. इस्कॉनचे सदस्य जागतिक पातळीवर मानवतावादी मूल्ये पोहोचविण्यास हातभार लावत आहेत. मंदिर संकुलातील भक्तिवेदांत आयुर्वेदिक केंद्र आणि वैदिक शिक्षण महाविद्यालय यामुळे समाजाला लाभ होईल, असे त्यांनी सांगितले.

सेवाभावातून प्रेरित दिशा

पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या आध्यात्मिक संस्कृतीचा पाया सेवेवर असल्याचे ठामपणे मांडले. सेवा हाच सामाजिक न्याय व खऱ्या धर्मनिरपेक्षतेचा आधार असल्याचे त्यांनी नमूद केले. इस्कॉनच्या पुढाकारामुळे नवीन पिढीला अध्यात्माची प्रेरणा मिळेल व सेवा आणि समर्पणाच्या मार्गाने त्यांचा विकास साधला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारताची आध्यात्मिक संस्कृती आणि इस्कॉनच्या सेवाभावाचा पाया जागतिक स्तरावर भारताला आध्यात्मिक नेतृत्व देईल, असा आशावाद पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.

सावित्रीबाई फुले: भिडे वाडा व स्त्री शिक्षणाच्या प्रेरणादायी प्रवासाची कहाणी

सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी लढा दिला व इतिहास रचला. भिडे वाडा स्मारकाची स्थिती व त्याचे महत्त्व जाणून घ्या.
सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी लढा दिला व इतिहास रचला. भिडे वाडा स्मारकाची स्थिती व त्याचे महत्त्व जाणून घ्या.
सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी लढा…

सावित्रीबाई फुले यांची जयंती आज उत्साहाने साजरी केली जात आहे. भारतात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ज्यांच्यामुळे रोवली गेली आणि ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंना सत्यशोधनाच्या खडतर प्रवासात मोलाची साथ दिली, त्या सावित्रीबाईंच्या जीवनाचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. त्या काळात स्त्री स्वातंत्र्याची कल्पनाही अशक्य वाटत होती. “स्त्री शिकली तर तिच्या सात पिढ्या नरकात जातील,” असा प्राचीन समज होता. अशा वेळी सावित्रीबाईंनी आणि महात्मा फुलेंनी शिक्षणाचा मार्ग स्वीकारून मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली.

भिडे वाडा: शिक्षणक्रांतीची पहिली पायरी, ज्यात शिक्षणाचे बीज रुजले व क्रांती सुरु झाली

पुण्यातील भिडे वाड्यात सावित्रीबाईंनी मुलींच्या शिक्षणाची सुरुवात केली. हे स्थान फक्त वास्तू नसून भारतीय स्त्रीशिक्षणासाठीचे पवित्र स्थान आहे. दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने या वाड्याचे रूपांतर राष्ट्रीय स्मारकात करण्याची घोषणा केली होती. आम्ही सर्व मराठी बांधवांनी त्या घोषणेला प्रचंड पाठिंबा दिला होता. परंतु, दुर्दैवाने हे काम अनेक कायदेशीर गुंतागुंतीत अडकले दिसत आहे व कोणाला त्याची परवा नाही. काही प्रकरणे न्यायालयात होती, जी आता निकाली लागली आहेत. हे काम अधिक वेळ थांबू नये, अशी आशा आहे. या स्मारकाला फक्त संग्रहालय किंवा पुतळ्यापुरते मर्यादित न ठेवता त्यात आधुनिकतेचा समावेश व्हावा. एक डिजिटल लायब्ररी, बहुभाषिक साउंड आणि लाईट शो यासारख्या गोष्टींनी हे स्मारक समृद्ध केले पाहिजे.

सरकारी लालफितीत अडकलेली अनेक स्मारके आपण पाहतो. भिडे वाड्याचे स्मारक देखील त्याच मार्गाने जाऊ नये, अशी अपेक्षा आहे. यासाठी सरकारने ठराविक कालमर्यादेत हे काम पूर्ण करावे. यासोबतच, सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या कार्याची महती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा.

आजच्या काळातील सावित्रीबाईंचे खूप महत्त्व आहे. सावित्रीबाईंचा वारसा आजही प्रेरणादायी आहे. आजच्या काळात महिलांनी विविध क्षेत्रांत उत्तुंग भरारी घेतली आहे. अंतराळात झेप घेणाऱ्या महिलांपासून उद्योगांच्या शिखरावर पोहोचलेल्या स्त्रियांपर्यंत सर्वांनी सावित्रीबाईंच्या शिक्षणक्रांतीचा वारसा पुढे नेला आहे. सावित्रीबाईंचा संघर्ष केवळ त्यांच्या काळापुरता मर्यादित नव्हता. तो प्रत्येक स्त्रीच्या स्वातंत्र्यासाठी आणि शिक्षणासाठी प्रेरणादायी आहे. भिडे वाड्याच्या स्मारकाचे काम वेळेत पूर्ण होऊन, ते एक प्रेरणादायी केंद्र होईल, अशी अपेक्षा आहे. सावित्रीबाईंच्या कार्याला खऱ्या अर्थाने आदर तेव्हाच मिळेल.

स्वामी विवेकानंद जयंती २०२५: टॉप 10 कोट्समधून शिकलेले धडे

स्वामी विवेकानंद जयंती २०२५: स्वामी विवेकानंदांचे 10 प्रेरणादायक कोट्स तुम्हाला आयुष्य अधिक शांततामय आणि यशस्वी बनवण्यासाठी मार्गदर्शन करतील, वाचा मराठीत.
स्वामी विवेकानंद जयंती २०२५: स्वामी विवेकानंदांचे 10 प्रेरणादायक कोट्स तुम्हाला आयुष्य अधिक शांततामय आणि यशस्वी बनवण्यासाठी मार्गदर्शन करतील, वाचा मराठीत.
हे १० स्वामी विवेकानंद कोट्स तुम्हाला नेहमीच्या प्रेरित करील.

स्वामी विवेकानंद हे भारताचे महान विचारवंत, तत्त्वज्ञ, आणि आध्यात्मिक नेते होते. त्यांच्या विचारांमध्ये जीवन जगण्याचा खरा अर्थ, कर्मयोग, आणि आत्मशक्ती यांचा सखोल अर्थ दडलेला आहे. 2025 मध्ये त्यांच्या जयंतीनिमित्त, त्यांच्या 10 महान कोट्समधून मिळणाऱ्या शिकवणीवर एक नजर टाकू या.

स्वामी विवेकानंद जयंती २०२५: टॉप १० कोट्समधून शिकलेले धडे

1. आत्मविश्वासाची महत्त्वता

“आपल्यावर विश्वास नसेल तर देवावरही विश्वास ठेवू शकत नाही.”
स्वामी विवेकानंदांनी सांगितले की, स्वतःवर विश्वास ठेवणे हेच आत्मविकासाचे खरे साधन आहे. आत्मविश्वासाशिवाय यश शक्य नाही.

2. कर्माचे फळ

“आपण जे पेरतो तेच उगवते. आपण स्वतः आपल्या भविष्याचे निर्माता आहोत.”
तुमच्या कर्तव्यात प्रामाणिक राहा, कारण प्रत्येक कर्माला त्याचे फळ मिळते.

3. उठा, जागा आणि ध्येय गाठा

“उठा, जागा, आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका.”
आपल्या ध्येयाच्या दिशेने अखंड प्रयत्न करणे हेच यशाचे रहस्य आहे.

4. शांततेचे तत्त्वज्ञान

“भीती आणि अपूर्ण इच्छा या सर्व दुःखांचे मूळ आहेत.”
स्वामीजींच्या मते, भीतीमुक्त जीवन आणि तृप्तीने भरलेले मनच शांततेसाठी आवश्यक आहे.

5. आत्मशक्तीचा साक्षात्कार

“तुमच्याशिवाय दुसरा कोणताही आध्यात्मिक गुरु नाही.”
स्वतःमध्ये असलेली शक्ती आणि ज्ञान हेच खरे गुरु आहेत.

6. जगाला दिलेला प्रेमाचा संदेश

“जितके आपण इतरांसाठी चांगले करतो, तितके आपले मन अधिक पवित्र होते.”
स्वामीजींच्या शिकवणीतून प्रेम आणि सेवा यांचे महत्त्व अधोरेखित होते.

7. उच्च विचारसरणीचा प्रभाव

“आपले मन उच्च विचारांनी दिवस-रात्र भरा. त्यातून मिळणारा परिणाम अनोखा असेल.”
योग्य विचारसरणीमुळे जीवनात सकारात्मक बदल होतो.

8. भारताची महानता

“हे देश धर्म, तत्त्वज्ञान आणि प्रेम यांचे जन्मस्थान आहे.”
भारतीय संस्कृतीची समृद्धी आणि तिचा अभिमान स्वामीजींनी आपल्या कोट्समध्ये मांडला आहे.

9. भीतीचा सामना करा

“जो अग्नि आपल्याला गरम करते, तोच आपल्याला नष्ट करू शकतो. ही अग्निची चूक नाही.”
आयुष्यातील अडचणींना सामोरे जाण्याचे धैर्य असणे महत्त्वाचे आहे.

10. धर्म आणि तत्त्वज्ञान

“भारत अजूनही धर्म, प्रेम, आणि तत्त्वज्ञानात इतर देशांपेक्षा श्रेष्ठ आहे.”
भारतीय तत्त्वज्ञान आणि धर्माचे जागतिक महत्त्व स्वामीजींनी अधोरेखित केले आहे.

१० कोट्समधून शिकलेले धडे यामध्ये आपल्याला स्वामी विवेकानंदांचे विचार आपल्यासर्वांना जीवनाच्या विविध अंगांनी समृद्ध करतात. या जयंतीनिमित्त, त्यांच्या कोट्समधून शिकून आपले जीवन अधिक यशस्वी आणि शांततामय बनवा.

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ मराठी अर्थ

vakratunda mahakaya in marathi: गणेश मंत्र "वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥" चंतन्याचे महत्व, फायदे आणि शास्त्रीय कारणांबद्दल जाणून घ्या.
vakratunda mahakaya in marathi: गणेश मंत्र "वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥" चंतन्याचे महत्व, फायदे आणि शास्त्रीय कारणांबद्दल जाणून घ्या.
गणेश मंत्र महत्व, फायदे आणि शास्त्रीय कारणांबद्दल जाणून घ्या. [Vakratunda mahakaya in marathi]

गणपती बाप्पा मोरया! हा नारा आपल्या मनातून सहज उमटतो. भारतात लहानापासून तर मोठया पर्यंत सगळे आरतीच्या वेळी ह्या मंत्राचा उचचार करतात, गणेश मंत्र हा केवळ एक मंत्र नाही तर एक अमोघ शक्ती आहे जी सर्वांना प्रदान केली जाते. हा मंत्र चंतन्याने आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि सकारात्मक उर्जेला आकर्षित करते, सर्वाना एकत्रित करून राग द्वेष नाहीसा करतो व सर्वांमध्ये आदराची भावना निर्माण करते.

गणेश मंत्र: एक अमोघ शक्ती: वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥[Vakratunda mahakaya in marathi]: वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ गणेश मंत्र सर्वांना माहित आहे परंतु ह्याचा अद्भुत प्रभाव माहित आहे का?

“वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥” हा मंत्र गणपतीचे स्तुतिमंडन करतो. कितीतरी काळांपासून हे आपल्याला माहित आहे कि गणपतीला विघ्नहर्ता म्हणून ओळखले जाते. बरेच हिंदू गणेशाचे चित्र, स्टिकर आपल्या गाडीवर लावतात जसेकि कार, बस, स्कूटीला देखील लावता. हा मंत्र चंतन्याने आपल्या जीवनातील अडथळे दूर करतो आणि सर्व कार्य सुकर घडवून आणतो. या मध्ये देवी महाकालीपेक्षा मोठी शक्ती आहे ज्याच्यामध्ये कोटी सूर्यप्रणाम आहे जे आपल्यासर्वांना जीवनदान देते.

गणेश मंत्र जादू व त्याचे अनेक फायदे आहेत. जर मनात एकाग्रता नसेल तर तो मन शांत करतो व आपल्याला फोकस ठेवतो, शरीरावरचा ताण-तणाव दूर करतो आणि सकारात्मक विचारांना जवळ आणून त्याला प्रोत्साहन देतो. त्यामुळे आपल्या शरीराला ताकत व बुद्धीला एक हवासारखा मार्ग दाखवते, याशिवाय, हा मंत्र बुद्धी तीक्ष्ण करतो, स्मरणशक्ती वाढवतो आणि एकाग्रता वाढवतो.

चला तर जाणून घेऊया कि काय वर कोणते शास्त्रीय आहेत ह्या मंत्रांचे व त्याने आपल्या शरीरातील कोणत्या ऊर्जा केंद्रांना प्रभावित करते? ह्या मंत्रामुळे शरीरात खूप मोठा बदल होतो , त्याच्या स्वरामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. याशिवाय, मंत्र रोज उचारल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि महत्वाचे म्हणजे नकारात्मक ऊर्जा कमी करते. तुमचे शरीर असो वा घर किंवा आजूबाजूचा परिसर असो, गणेश मंत्रजप करण्यासाठी कोणत्याही विशिष्ट वेळीच किंवा ठिकाणी बसण्याची गरज नाही. आपण कोणत्याही वेळी, कोणत्याही ठिकाणी बसून हा मंत्र चंतन करू शकता. मात्र, सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्यापूर्वी हा मंत्र चंतन करणे अधिक फायदेशीर ठरू शकते. तसेच काही विशेष तयारी करण्याची गरज नाही, आपण स्वच्छ कपडे घालून शांत मनस्थितीत बसून हा मंत्र जप करायला पाहिजे. सर्वात आधी आपण मंत्राचा अर्थ समजून घेतला तर अधिक चांगले.

गणेश मंत्र चिंतन करण्यासाठी आपण मंत्राचे स्पंदन जाणवू द्या. मंत्राचे स्पंदन आपल्या शरीरात जाणवू लागले की आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो. त्याचे विब्रेशन जेव्हा नासोनासी गेली कि मग मंत्राचा प्रभाव अधिक वाढतो. गणेश मंत्र मनन करून आपण आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. हा मंत्र आपल्याला सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंदाचे वरदान प्रदान करतो. गणेश मंत्र हा आपल्या जीवनातील अनेक समस्यांचे निराकरण करण्याची शक्ती देतो. त्यामुळे, आपण आजच गणेश मंत्र जपायला सुरुवात करूया आणि आपल्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणूया.

भविष्याच्या विचारासाठी या पाच गोष्टी लक्षात असू द्या

सोमवारी गावावरून पुण्याला येताना शिरूरला थांबलो. पाहुणे सोबत असल्यामुळे त्यांनी चहा घेऊन तुला सोडतो, असं सांगितलं आणि एका ठिकाणी घेऊन आले. Wholemeal Baker's येथे आल्यानंतर मालक सिद्धार्थ यांच्याशी ओळख करून दिली. आपण शिरूर परिसरातील असाल तर तुम्हाला Cafe College Katta माहित असेल, याच cafe चे मालक सिद्धार्थ यांच्याशी भेट झाली.

सोमवारी गावावरून पुण्याला येताना शिरूरला थांबलो. पाहुणे सोबत असल्यामुळे त्यांनी चहा घेऊन तुला सोडतो, असं सांगितलं आणि एका ठिकाणी घेऊन आले. Wholemeal Baker’s येथे आल्यानंतर मालक सिद्धार्थ यांच्याशी ओळख करून दिली. आपण शिरूर परिसरातील असाल तर तुम्हाला Cafe College Katta माहित असेल, याच cafe चे मालक सिद्धार्थ यांच्याशी भेट झाली.

त्यांच्याशी बोलताना ते सध्या 2 कॅफे, 1 केक शॉप, 2 बेकरी आणि 2 सँडविच कॅफे चालवत असल्याचं त्यांनी सांगितलं. Tier 2 आणि Tier ३ शहरांमध्ये startup culture वाढत असल्याचे यावेळी लक्षात आले. एवढं सगळं ऐकून घेतल्यानंतर माणसं एकाच वेळी किती गोष्टी करतात आणि आपण मात्र कारणे सांगत बसतो, असंही वाटून गेलं. सिद्धार्थ यांनी attendance साठी thumb system वापरत असून त्याचा वापर कसा केला जातो, याबद्दल माहिती दिली. त्यानंतर मला त्यांच्या भेटीतून काही गोष्टी लक्षात आल्या त्या पुढे देत आहे.

भविष्याचा विचार

1. कॅफेची Social Media Marketing –
कॅफेचे मालक सिद्धार्थ हे सर्व startupची marketing स्वतः करतात. त्यांनी सांगितलं की, reels बनवण्यासाठी course केला आहे. सिद्धार्थ यांनी 21 दिवसांचे चॅलेंज, मतदान trend video, influencer collaboration इ.वेगवेगळे प्रयोग हे सोशल मीडियावर करून पाहिलेत. त्यामध्ये consistency आणि quality ठेवल्यामुळे audience वाढत आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडियावर महिन्याचा reach 2 ते 3 लाख असून तो कमी झाल्यावर ते paid ads लावतात.

2. भविष्याचा विचार करून व्यवसाय विस्तार –
भविष्याचा विचार करून सिद्धार्थ हे व्यवसाय करत असल्याचे दिसून आले. सुरुवातीला 2013 मध्ये त्यांनी कॅफे कॉलेज कट्टाची सुरुवात केली. त्यानंतर cake shop, bakery, eggs cafe आणि sandwich cafeचा विस्तार केला. त्यांचा भविष्यातील roadmap तयार असून franchisee business मध्ये ते लवकरच enter करणार आहेत.

3. Technology चा वापर –
सिद्धार्थ हे टेक्नॉलॉजीचा वापर करत असल्याचे दिसून आले. आपल्याकडे कामाला असणाऱ्या employee च्या हजेरीसाठी त्यांनी software विकत घेतले असून त्यावर कर्मचारी किती वाजता आले आणि किती वाजता गेले, याबद्दलची माहिती मिळते. त्यानंतर चहाचे कप धुवायला मशीन घेण्यासंदर्भात त्यांनी बोलताना सांगितलं. कामाचा ताण कमी करून business वाढवण्यावर ते लक्ष देत असल्याचे लक्षात आले.

4. Multitasking करणे –
एकटा माणूस एकाच वेळी किती काम करू शकतो याला मर्यादा नसते, हे सिद्धार्थ यांच्याकडे पाहून समजले. सिद्धार्थ बोलत होते, कर्मचाऱ्यांची हजेरी तपासत होते, बेकरीकडे लक्ष देत होते आणि कोणाला काय हवं नको ते पाहत होते. एकाच वेळी अनेक perfect काम करणे हे व्यवसायात किती उपयुक्त असते, हे लक्षात आले.

5. Online Presence कडे लक्ष देणे –
सिद्धार्थ यांचे social media platform सोबतच इतर online प्लॅटफॉर्मकडे लक्ष असल्याचे इंटरनेटवर सर्च केल्यावर लक्षात आले. Justdial आणि Google Map वर त्यांचा Wholemeal Baker’s हा ब्रँड असून दुसऱ्या बाजूला Cafe College Katta हा ब्रँड Zomato वर आहे. त्याला google map वर सरासरी 4 rating मिळाल्याचे दिसून आले.